गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी प्रथमच अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांसाठी बससेवेला सुरुवात

84

 

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी प्रथमच अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांसाठी बससेवेला सुरुवात

 

नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवून नृत्य करुन वाजत गाजत बसचे केले स्वागत; शालेय विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वज फडकवत आनंद साजरा

 

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमाअंतर्गत आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा आंबेझरी पर्यंत बससेवा सुरु करण्यात आली आहे.

 

याचवर्षी दिनांक २६/०४/२०२५ रोजी गडचिरोली ते मौजा कटेड़ारी अशी बससेवा गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आली होती. याचप्रमाणे जिल्हा पोलीस मुख्यालयापासून १०० कि.मी. आणि कटेझरी येथून २१ कि.मी. असलेले अतिदुर्गम मौजा आंबेझरी येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नागरिकांना तहसिल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत वाजत गाजत बसचे स्वागत केले. यासोबतच शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेड़ारीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले. तसेच हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. गडचिरोली-चातगाव-धानोरा-येरकड-मुरुमगाव-खेडेगाव-आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा मार्गावर सुरु झालेल्या या बस सेवेमुळे या भागातील १५ हुन अधिक गावांमधील नागरिकांना लाभ होत त्यांचे जीवनमान सुसह्य होणार आहे. बससेवा सुरु झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. सदर मार्गावरील एस.टी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येणे शक्य होईल. सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मुलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण ५०७ मोचाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली असून, एकूण ४२० कि.मी. लांचीच्या रस्त्याचे आणि ६० पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षभरातच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.) गर्दैवाडा वांगेत्री, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकणार ते अहेरी रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

 

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा श्री. जगदीश पांडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेहारीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले व इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.