अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठा,रदेसाईगंज येथील दुधडेयरी-तुळशी फाट्या लगतची घटना
देसाईगंज-
तालुक्यातील आमगाव (बुट्टी)येथील रहिवासी असलेले एकाच कुटुंबातील चार जण कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा- गुडगुडा येथील नातेवाईकाचा दुपारी लग्न लावून परत येत असताना देसाईगंज शहरापासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधडेयरी-तुळशी फाट्या लगत अचानक अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने मृतकांच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला आहे.
भारत राजगडे(३३ वर्षे) पत्नी अंकिता भारत राजगडे (२९ वर्षे)तर चार वर्षीय मुलगी देवांशी व दोन वर्षीय बाली असे अंगावर वीज कोसळून जागीच ठार झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी असलेले पती पत्नी आपल्या दोन चिमुकल्या अपत्यासह कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा-गडगडा येथे आयोजीत नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते.लग्न कार्यक्रम आटपून स्वगावी परतीच्या मार्गांवर असताना अचानक वीजांच्या गडगटासह पाऊस सुरु झाल्याने देसाईगंज-कुरखेडा मार्गांवर असलेल्या दुधडेयरी-तुळशी फाट्या लगत आपली दुचाकी उभी करून कुटुंबा समवेत झाडाच्या आसऱ्याने उभे असता सायंकाळी ५.४० च्या सुमारास अचानक वीजेचा गडगटा होऊन वीज कुटुंबार कोसळल्याने चौघेही जागीच ठार झाले.
भारत राजगडे हा झाडिपट्टी रंगभूमीत कार्यरत कलावंत असुन सद्या स्थितीत तो लग्न संभारंभ,वाढदिवस व इतरही कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजीत मौफिलीचे कार्यक्रम घेऊन कुटुंबाचा गाडा चालवित होता.आई-वडिलांना एकच मुलगा असुन काही वर्षापुर्वीच वडिलाचे निधन झाल्याने म्हाताऱ्या आईसह कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होता.दरम्यान लग्न संभारंभ आटपून परतिच्या मार्गांवर असताना अचानक कुटुंबावरच वीज कोसळून संपुर्ण कुटुंबच जागीच ठार झाल्याने म्हाताऱ्या आईचा आधारच हरवल्याने
परिवारातील सदस्य पुरते हादरले आहेत.
*प्रेत विखुरले पडुन, आसऱ्याला असलेले माञ बघ्याच्या भूमिकेत*
सदर घटना घडली त्यावेळी लगतच्या झाडांच्या आसऱ्याला अनेकजण थांबून होते.वीज अंगावर कोसळून चौघांचेही प्रेतं विखुरले पडले असताना त्यांना उचलण्याची कुणीही तसदी न घेता मोबाईल फोटो घेण्यात व्यस्त बघ्याच्या भूमिकेत दिसुन आल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.मोबाईलच्या जमान्यात माणुसकीच हरपली की काय?असा प्रश्न उपस्थित केल्या जाऊ लागला असुन उपस्थितांच्या माणुसकीवर प्रश्न चिन्ह लावल्या जाऊ लागले आहेत. दरम्यान घटनेबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबातील चौघांनाही शवविच्छेदना करीता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचा मर्ग देसाईगंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या माग॔दश॔नात पोलिस करीत आहेत.