*सत्याचा विजय*- महेंद्र ब्राम्हणवाडे
गडचिरोली:: काँग्रेस नेते राहुलजी गांधी हे नेहमीच अन्यायाविरुद्ध देशातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताकरता आवाज उचलणारे नेते आहेत आमच्यासारख्या अनेक युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. भाजप सरकारच्या हुकूमशाही धोरणाविरुद्ध राहुल गांधी सतत आवाज उचलत असताना आणि भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादला घाबरून त्यांचा आवाज दडपण्याकरीता व संसदेत जाण्यापासून रोखण्याकरिता भाजप सरकारने सुड बुद्धीच्या राजकारणातून कट कारस्थान करून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने राहुलजी गांधी यांना झालेल्या शिक्षेबाबत स्थगिती देऊन अंतिम ता सत्याचा विजय होतो हे दाखवून दिले आहे. या निर्णयामागे सर्वसामान्य जनतेमध्ये न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास अधिक भक्कम झालेला आहे.





