प्रहार संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्याहस्ते जिल्हा कार्यकारिणी ची निवड.

81

प्रहार संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्याहस्ते जिल्हा कार्यकारिणी ची निवड.

 

गेल्या अनेक वर्षांपासून मा. बच्चूभाऊ च्या दिव्यांग, आरोग्य व शेतकरी यांच्या विषयच्या कार्याने प्रेरित होऊन जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते हे प्रहारशी जुडून पदाशिवाय सुद्धा सामाजिक व राजकीय पातळीवर कार्य करीत होते मागील या कार्याचा भाऊ सुद्धा प्रहारचे गडचिरोली जिल्ह्यात जाळे पसरल्याने खूप उत्साही होते, पण मधल्या काळात काही घडामोडी घडल्याने कार्यकारिणी चीही घोषणा होत नव्हती त्यामुळे कार्यकर्ते यांच्यातही एक संभ्रम होता. पण गेल्या में महिन्यात बच्चूभाऊने कार्याची दखल घेऊन कार्यकारिणी निवडीचे संकेत दिल्याने अनेकांचे डोळे कोणाची निवड होते याकडे लागले होते.

पण भाऊने गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास पाहता एका टोकापासून ते दुसरऱ्या टोकाच्या अंतर चा विचार करताना व काम करण्यासाठी सोपे होईल यादृष्टीने जिल्ह्यात दोन जिल्ह्याध्यक्ष नेमणूकीचे संकेत दिले होते. ते सत्यात उतरविले तेव्हा दोन विभागात विभागणी करून *गडचिरोली, आरमोरी, धानोरा, वडसा, कुरखेडा, कोरची* या तालुक्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भू.) येथील प्रहारचे सक्रिय व धडाडीचे प्रहारसेवक *मा. निखिल धार्मिक* यांची व तर आष्टी चे प्रहारसेवक *मा. मंगेश पोरटे* यांची चामोर्शी, मुलचेरा,अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यासाठी जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करून गडचिरोली शहर अध्यक्ष म्हणून *मा. स्वप्नील गौतम* तसेच प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हाध्यक्ष म्हणून आंधळी (कुरखेडा) येथील उपसरपंच *मा.अप्रव भैसारे* यांची निवड करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र भाऊंनी निखिल धार्मिक डोंगरगाव येथील यांच्या घरी भेट देऊन दिले.

यामुळे प्रहार सेवक यांच्यात उत्साहाचे वातावरण असून या नियुक्ती बद्दल वरिष्ट प्रहार पदाधिकारी व जनसामान्य कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

या निवडीबद्दल सर्वस्वी वरिष्ट स्तरावरून तसेच जिल्ह्यातील प्रहारसेवक अक्षय बोरकर, राजेश रेभणकर, विनोद निमजे, संकेत गड्डमवार, भुदेव धकाते,विवेक ठाकरे,रिंकू झरकर, अनंत भाऊ भोयर,हर्षवर्धन मडावी, अरविंद धकाते ऋषभ कुळमेथे, विक्की उंदीरवाडे, निखिल वाकडे, विकास धंदरे,अमीर शेख, संजय मेश्राम, केवळ दुमाने विनोद जांभुळकर व आदी पदाधिकारी यांनी निवडीचे स्वागत करून, नवीन पदाधिकारी हे सर्वसामान्य यांच्या अडीअडचणी नक्कीच सोडवतील अशी आशा मा. राजेश रेभणकर यांची व्यक्त केली आहे.