खंडित वीज पुरवठा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन,
चार गावचे नागरिक तहसील कार्यालयावर धडकले,
एटापल्ली;
तालुका मुख्यालयापासून सहा की. मी. अंतरावरील ऐकरा (बूज.), ऐकरा (खुर्द.) तसेच दोन्ही गावांची दोन टोले अशा चार गावांचा वीज पुरवठा गेली पंधरा दिवसांपासून खंडित असून खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलीस पाटील सादु दुर्वा व नागरिकांनी तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना निवेदनातून केली आहे.
उन्हाळ्याच्या उकडत्या तापमानात गर्मीच्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, वयोवृद्ध नागरिक, लहान बालके व आजारी नागरिकांना उन्हाच्या तडाख्यामुळे गर्मीच्या उखड्यापासून त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. घरगुती वापराचे फ्रीज, कुलर, पंखे, मोबाईल संच, पीठ गिरणी, अशी विद्युत उपकरणे खराब होऊन नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे, वरील समस्येवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन कोणतीही कारवाही केली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
त्यामुळे गेली पंधरा दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करून देण्याची मागणी तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना दिलेल्या निवेदनातून नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलीस पाटील सादु दुर्वा, माजी सरपंच सादु गावडे, नंदू मट्टामी, देऊ गावडे, दलसु मितलामी, व नागरिकांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.