*जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक तात्काळ घेण्यात यावी – जनकल्याण प्रतिष्ठान ची मागणी*
गडचिरोली दि. ६ – जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान ने केली आहे. महाराष्ट्र शासनाने आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण तात्काळ निकाली निघावे यासाठी जिल्हा स्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समितीची स्थापना केली आहे. जेणेकरून जिल्हयातील विविध विभागातील भ्रष्टाचारांची प्रकरणे समितीपुढे जनतेला मांडता येतील. २०२१ नंतर तब्बल दोन वर्षाने म्हणजे २८-१२-२०२३ ला सभा घेण्यात आली तेंव्हापासून अजूनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणे प्रलंबीत आहेत यामुळे भ्रष्टाचार करणा-यांना मोकळे रान मिळत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी याबाबतीत गंभीर दखल घेऊन तात्काळ भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा घ्यावी अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली व सचिव प्रा. अशोक लांजेवार यांनी केली आहे. —————————————-