*गडचिरोली जिल्ह्याची स्थानिक भरती झालीच पाहिजे -तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम (सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली )*
मा.तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात अतीदुर्गम व नक्षलग्रस्त या अनुषंगाने येणाऱ्या गडचिरोली जिल्हातील सर्व प्रशासकीय विभागातील (क व ड ) संवर्गातील पद पोलिस भरती प्रमाणे स्थानिक उमेदवाराकडुन भरण्यात यावी याची शासन निर्णय काढण्यासाठी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम (सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ) यांनी असंख्य युवा बेरोजगारांना घेऊन गडचिरोली जिल्हाअधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पत्र पाठविले. त्या वेळेला असंख्य युवा बेरोजगार उपस्थित होते.