*_शिख गुरुगोविंद सिंह यांचे शहीद पुत्र बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह या साहिबजाद्यांच्या बलिदानाला मानवंदना: बालदिन वीर बाल दिवस म्हणून समर्पित करावा – मा. खा. अशोकजी नेते_*
दिं. २६ डिसेंबर २०२४
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील गोकुळनगर येथील शिख गुरुद्वारा मंदिरात आणि मा.खा.अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह या साहिबजाद्यांच्या शौर्याला आदरांजली अर्पण केली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून या वीरांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी वीर बाल दिवसाचे महत्त्व विशद करताना माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी म्हणाले शिखांचे दहावे गुरु श्री गुरू गोविंद सिंह यांचे दोन सुपुत्र, जोरावर सिंह (वय ९) आणि फतेह सिंह (वय ७), यांनी २६ डिसेंबर १७०५ रोजी मोगलांच्या अत्याचाराला न झुकता आपल्या धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. वझीर खान यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु या धाडसी बालकांनी निर्भयतेने त्याला नकार देत धर्मासाठी आपले प्राण अर्पण केले.साहिबजादा अजीत सिंह, जुझार सिंह, जोरावर सिंह, आणि फतेह सिंह यांनी धर्म व मानवतेसाठी दिलेले बलिदान प्रेरणादायी आहे.
पुढे बोलत बाबा जोरावर सिंह व फत्तेहसिंग यांचे जीवन मुलांना शौर्य, निस्वार्थता, आणि धर्माच्या प्रति निष्ठा याबाबत प्रेरणा देते,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून वीर बाल दिवस साजरा करण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे असे मत नेते यांनी व्यक्त केले.
आमदार डॉ.मिलिंद जी नरोटे यांनी या प्रसंगी विचार व्यक्त करत म्हणाले भारतीय इतिहास त्याग, बलिदान, आणि शौर्याने भरलेला आहे. जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांच्या बलिदानाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या शौर्याला मान्यता देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची कल्पना सर्वत्र अनुकरणीय ठरली आहे. या अविस्मरणीय शौर्याला सलाम! असे बोलत या ठिकाणी सांगीतलेल्या समस्या संबंधित लवकरचं निराकरण होईल असा विश्वास देतोय तसेच आपण दिलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील विजयी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,यांनी या प्रसंगी बाबा जोरावर सिंह व बाबा फत्तेहसिंह यांच्या जिवनावर प्रकाश टाकत
शिख धर्माच्या या बलिदानाने धर्म व सत्यासाठी वीर बाल दिवस म्हणुन हा त्यांच्या स्मृतींना समर्पित करतो.
*कार्यक्रमाची सांगता:*
बाबा जोरावर सिंह व बाबा फत्तेहसिंह या साहिबजाद्यांच्या स्मरणार्थ अभिवादन करत “जब तक सूरज-चांद रहेगा, जोरावर सिंह आणि फतेह सिंह तुमचं नाव अमर राहील,” अशा शब्दांत सांगता करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने मा.खा. अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,आमदार डॉ.मिलिंद जी नरोटे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर,ता.महामंत्री बंडूजी झाडे,श्याम वाढई,प्रशांतजी अलमपटलावार,राकेश राचमलवार, भुपेंद्र कुळमेथे, अविनाश विश्रोजवार,बंडु नैताम, राजेंद्र सिंग पटवा,मंगल सिंह पटवा,गुरुदेव सिंग दुढाले,गुमान सिंग पटवा,किर्तन सिंग पटवा,जर्नल सिंग पटवा, सुरेंद्रसिग, भगतसिंग, नानक सिंग,बच्चेन कौर,जरनिद कौर,अंजली कौर, आणि अनेक शिख बांधव व भगिनीं तसेच कार्यकर्ते मान्यवर उपस्थिती होते.