*_आसोला चक (मेंढा) आणि सावंगी दीक्षित पुनर्वसन मागण्यांसाठी आढावा बैठक उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुल येथे माजी खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न_*

27

*_आसोला चक (मेंढा) आणि सावंगी दीक्षित पुनर्वसन मागण्यांसाठी आढावा बैठक उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुल येथे माजी खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न_*

दिनांक: ०७ जानेवारी २०२५

 

सावली तालुक्यातील आसोला (चक, मेंढा) आणि सावंगी दीक्षित या पुनर्वसित गावांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुल येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

 

अशोकजी नेते यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “आपल्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुनर्वसन खात्याच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शासन दरबारी निवेदन सादर करून आणि अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन लवकरच यावर तोडगा काढला जाईल.”

 

*चर्चेतील मुख्य मुद्दे:*

या बैठकीत पुनर्वसित गावांच्या शेती मोबदला, प्रकल्पग्रस्त दाखल्याचा पुरवठा, अनुदान आणि अन्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

*पुनर्वसित गावांच्या मुख्य मागण्या:*

१) २०१८-१९ मध्ये भूसंपादनानंतर शिल्लक शेती विक्रीसाठी परवानगी.

२) भूसंपादन झाल्यानंतर सामुग्रह अनुदान मंजूर करणे.

३) १८ वर्षांवरील कुटुंबांना मोबदला व अनुदान देणे.

४) विवाहित कुटुंबांसाठी वाढीव अनुदानाचा पुरवठा.

५) १८ वर्षांवरील मुलांना मोबदला व अनुदान देणे.

६) शासन निर्णयानुसार पाच लाख रुपये अनुदानासह प्रकल्पग्रस्त दाखल्याचा पुरवठा.

७) पुनर्वसन समितीच्या नियमित बैठका आयोजित करणे.

 

*उपस्थित मान्यवर:*

या बैठकीला उपविभागीय अधिकारी अजयजी चरडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे अभियंता चिंतलवार, सिंचाई व पुनर्वसन विभागाचे अधिकारी तसेच भाजपा तालुका महामंत्री व नगरसेवक सतिश बोम्मावार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंतजी ताडाम, पुनर्वसन समितीचे सदस्य इंदरशहा पेंदाम, मुखरु जुमनाके, होमराज वलादे, राकेश सुरपाम, श्रावण गेडाम, सोमेश्वर पेंदाम यांसह आसोला चक (मेंढा) व सावंगी दीक्षित गावातील ४०-५० नागरिक उपस्थित होते.

 

या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे गावकऱ्यांच्या मागण्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. शासन स्तरावर लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघेल अशी ग्वाही अशोकजी नेते यांनी दिली.