*देशाला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प*
*-गीता हिंगे*
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारमन यांनी 2025 वित्तीय बजेट ची घोषणा केली, या बजेटमध्ये विकासाला चालना देणारे सर्वच मुद्दे समावेशित आहेत या अर्थसंकल्पात सर्वांचा विकास सुनिश्चित करण्यात आलेला आहे प्रायव्हेट सेक्टरला पोषक वातावरण निर्मिती, मध्यमवर्ग यांची क्रशक्ती वाढविणे या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले महान तेलगू कवी गुराजादा आप्पाराव यांनी म्हटले आहे की कोणताही देश त्याच्या मातीमुळे नसतो तर त्या देशाच्या लोकांमुळे असतो ह्या शब्दाच्या आधारावरच या बजेटमध्ये गरीब, युवा, शेतकरी व स्त्रीयांच्या विकास यावर लक्ष केंद्रित केले आहे यामध्ये कृषी विकासावर भर देण्यात आला, ग्रामीण विकास, मेक इन इंडिया ला प्राधान्य देण्यात आले, वीज स्त्रोत निर्यातीला प्रोत्साहन देणे अशा प्रकारच्या विविध विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले, ह्या बजेटचा उद्देश सहा क्षेत्रामध्ये सुधारणा करणे आहे. करनिर्धारण, विद्युत क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, खनन, विनायमक बदल या क्षेत्रावर कार्य करण्यात आलेले आहे. यामध्ये किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा तीन लाखावरून पाच लाख करण्यात आली, सूक्ष्म आणि लघुउद्योगांना चालना देणे, महिलांसाठी विशेष कर्जाची व्यवस्था करण्यात आली, अंगणवाडी सक्षम करण्यात येईल, आयआयटीच्या क्षमतेचा विस्तार करण्यात येईल आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आयकर मध्ये खूप समाधानकारक बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे मध्यमवर्गीय आयकर भरणारे निश्चितच खुश होतील एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहे