*गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या सरकारकडे स्थानिकांसाठी सुरजागड ते गट्टा रस्ते सुधारण्यासाठी निधी का नाही?*- *भाकपा*

151

*गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या सरकारकडे स्थानिकांसाठी सुरजागड ते गट्टा रस्ते सुधारण्यासाठी निधी का नाही?*- *भाकपा*

 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. विशेषतः, सुरजागड ते गट्टा या मार्गावरील रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा वारंवार उल्लेख करत विकासाच्या दाव्या केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे.

 

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल

 

हा मार्ग १९९७-९८ मध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने तयार केला होता, मात्र त्यानंतर शासनाने या रस्त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. शासनाकडून कुठलीही देखभाल दुरुस्ती न झाल्याने हा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलमय होऊन वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो.

 

या मार्गावरून गट्टा आणि परिसरातील नागरिक सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी, बँकिंग सेवांसाठी, तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करतात. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता या भागातील लोकांना अत्यंत कष्टप्रद प्रवास करावा लागत आहे. विशेषतः आरोग्य आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका (ऍम्ब्युलन्स) या भागात पोहोचणे कठीण होते, ज्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांचे प्राणही धोक्यात येऊ शकतात.

 

संपत्तीचा उपसा, पण मूलभूत सुविधा नाहीत!

 

या परिसरातील सुरजागड खाणीतून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो, मात्र या भागातील लोकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे शासन मोठमोठे उद्योग आणि खाणींच्या माध्यमातून समृद्धीचे गोडवे गात आहे, पण स्थानिक नागरिक मात्र रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधांसाठीही वंचित आहेत.

 

निवडणुकीत आश्वासने, पण रस्ता तसाच!

 

विधानसभा निवडणुकीदरम्यान या रस्त्याचा प्रश्न जोरात मांडण्यात आला होता. प्रत्येक उमेदवार आणि पक्षाच्या नेत्यांनी हा रस्ता तत्काळ दुरुस्त करू असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात अद्याप काहीही हालचाल झालेली नाही.

 

नागरिक संतप्त, आंदोलनाची तयारी!

 

हा प्रश्न गंभीर असल्यामुळे भारतीय कम्युनिष्ठ पक्ष लवकरच आंदोलन करण्याचं इशारा दिल आहे तसेच सतत प्रशासनच्या निष्क्रियतेमुळे प्रचंड संतप्त झाले असून, जर लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस पावले उचलली नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय कम्युनिष्ठ पक्षांनी दिल आहे तरी शासनाने या भागातील नागरिकांच्या भावना ओळखून तातडीने सुरजागड ते गट्टा मार्गाची दुरुस्ती सुरू करावी, अन्यथा पक्ष आणि जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहेत!

 

भारतीय कम्युनिष्ठ पक्ष अहेरी विधानसभा 🚩