अवकाळी’ने केली शेतकर्यांची ‘अवकळा!’
पळसगाव पाथरगोटा जोगीसाखरा रामपुर नवरगावसह विविध गावांमध्ये थैमान
आमदार रामदास मसराम यांनी केली अवकाळी पावसाच्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी
आरमोरी – तालुका पळसगाव जोगीसाखरा पाथरगोटा रामपुर नवरगावसह तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे अवकाळी वादळ-वार्यासह पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक अक्षरशः अहवालदिल झाला आहे. असल्यामुळे काल आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी या भागांचा दौरा करून पाहणी करते वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान शेतातील बाधीत पाणी साचल्याने पडुण वाफले तर काही धानाची दुर्गंधी निर्माण झाली तर काही शेतकऱ्यांचे ओले झालेले धान रस्तेवर वारण्याठी टाकले असता तेही धान मुकले असल्यामुळे ते धान कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी समोर जाण्याची वेळ आली असल्याने
अवकाळी’ने नुकसान झालेल्या धान पिकांचे पंचनामे करून तातडीने करुन नुकसान भरपाई साठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार रामदास मसराम यांनी प्रभारी तहसीलदार दोनाडकर यांना दिले.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती परसराम टिकले गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम पंचायत समिती माजी सदस्या वृंदाताई गजभिये सरपंच जयश्री दडमल उपसरपंच गडफडे सामाजिक कार्यकर्ते भेनेश्वर अबादे चदु टेभुणे,देवनाथ झलके, आनंदराव राऊत देवनाथ झलके रविशंकर ढोरे राजेंद्र मने वामन टेभुणे मगरु वरखडे शैलेश कुमरे कितीलाल पुराम सविता येळमे देविदास ठाकरे महेंद्र पेन्दाम सुरज ठाकरे तुषार गोधोळे कातीक मातेरे यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.






