*होवु द्या चर्चा या उपक्रमात अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या नेतृत्वात शेकडो महिला व पुरुषांचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश*

55

*होवु द्या चर्चा या उपक्रमात अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या नेतृत्वात शेकडो महिला व पुरुषांचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश*

 

 

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख मा.*उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी दिंनाक ०२/०९/२०२३ ला रंग शारदा सभागृह बांद्रा मुबंई येथे राज्यातील शिवसेना च्या पदाधिकारीनां *होवु द्या चर्चा* हा कार्यक्रम राबविन्याचे सुचना केल्या.ह्या कार्यक्रमाचे द्वारे मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असत‍ांना जनतेसाठी केलेली लोकाभिमुख कामे व मागिल एक वर्षात *घटनाबाह्य मिंदे* सरकार ने केलेला राज्यातील जनतेचा वाटोळा हे गावागावांत जावुन शेवटच्या मानसापर्यत पोहचविण्याचे आदेश सर्व पदाधिकारींना दिलेले आहेत. त्याचाच भाग म्हनुन अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना पदाधिकारी गावागावांत जात आहेत. आज *दिंनाक २५/०९/२२३ ला अहेरी येथील प्रभुसदन प्रभागातील असंख्य लोकांनी यावेळेस मा.उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेत्रुत्वावर विश्वास ठेवुन महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केलेत.* अहेरी विधानसभा क्षेत्रात होऊ द्या चर्चा उपक्रम राबवून केंद्र शासन व राज्य शासन यांच्या योजनांचे भांडाफोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा. श्री. महेश जी केदारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वात जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पोलखोल कार्यक्रम शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा पटांगणावर घेण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख यांनी गोंडी आणि माडिया भाषेत या कार्यक्रमाची सुरवात केली तसेच उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शनात शासन आपली फसवणूक करून राहिली ज्या प्रमाणे योजनांचा फायदा मिळाला पाहिजे तो मिळत नाही केवळ कागदावरच योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बेरोजगार यांना न्याय मिळत नाही हाताला काम मिळत नाही अशा परिस्थितीत अहेरी विधानसभा क्षेत्रात रस्ते गड्डेमय झाल्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा, डॉक्टरांची रिक्त जागांची पदभरती होत नसल्यामुळे रुग्णांना उपचार मिळायला पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाही. अशी बिकट परिस्थिती अहेरी विधानसभेत अनेक प्रश्न असताना लोकप्रतिनिधी या संपूर्ण गोष्टीकडे डोळे झाक करीत असल्याने नाहक जनतेला त्रास होत आहे शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष सोबत जुळून आपण सर्व एकजुटीने शासन प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने लढा उभारू जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन उभारणार असे भाषणात जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी मत व्यक्त केले.

होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात श्री.अक्षय पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली यांनी राज्य शासनाच्या कागदावरच्या बोगस योजनांचा भांडाफोड करीत शासन जनतेकडे लक्ष न देता खुर्ची बचाव, एकमेकांवर टीका टीपणी मध्ये गुंतलेले असून सामान्य जनतेकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने जनतेचे हाल बेहाल झालेले आहेत यासाठीच आपण सर्वांना एकजुटीने जन आंदोलन उभारणे गरजेचे आहे. असे आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मनिष दुर्गे तालुका प्रमुख एटापल्ली तसेच अहेरी येथील प्रभूसदन प्रभागातील शेकडो महिला व पुरुष यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आले यावेळी महेश दिवाकर मडावी, मदन शंकर आत्राम, रमेश रैनू पुंगाटी, सुरेश मडावी, काशिनाथ सडमेक, राजू पल्लो, गणेश दूर्वा, रोशनी मडावी, रैनू वड्डे, मुंशी नरोटे, शिवानी मडावी, महेश मडावी, रमेश वेलादी, सोनु पोदाळी, चुकू पुंगाटी, संतोष आत्राम, तानाजी नरोटे, सुकराम मडावी, शिल्पा पल्लो, दोगे पोधाडी, पोरके मडावी, ज्योती मडावी, लालसू पल्लो, निर्मला गुरनुले, रोशना गुरनुले, चंद्रा आत्राम असे *असंख्य पुरुष व महिला शिवबंधन बांधुन जाहीर प्रवेश केल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढून राहिली नक्कीच याचा फायदा येणाऱ्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार.*