स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी 3 मार्च पर्यंत पुस्तके पाठविण्याचे आवाहन
गडचिरोली,(जिमाका)दि.15: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2020 करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणा-या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 3 मार्च, 2021 पर्यंत पाठविता येणार आहेत.
दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र राहील. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला , सयानी रोड, प्रभादेवी ,मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई वगळता अन्यत्र संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर’ नविन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङय पुरस्कार 2020 नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व ‘What’s new या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2020 Rules Book and Application Form’ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 3 मार्च, 2021 पर्यंत पोहोचतिल अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
मुंबईतील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,रविंद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड , प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्या. मुंबई वगळता अन्य ठिकाणच्या लेखक /प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दिनांक 1 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 3 मार्च, 2021 पर्यंत पाठवावे , प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 3 मार्च, 2021 हा राहील विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत .असे आवाहन सचिव ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.