भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वोदय वॉर्ड गडचिरोली येथे संपन्न

26

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वोदय वॉर्ड गडचिरोली येथे संपन्न

 

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वोदय वॉर्ड गडचिरोली येथे निलेश आत्राम यांच्या पुढाकाराने प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला सौ गीता हिंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या,बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यानी अभिवादन केले या प्रसंगी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व बाबासाहेबांचे कार्याचा थोडक्यात परीचय करून दिला, बाबासाहेबांच्या वैचारिक दूरदृष्टी वर त्यांनी प्रकाश टाकला, महिलांसाठी केलेल्या कार्याचा व त्यांना मिळउन दिलेल्या हक्काचा प्रामुख्याने उल्लेख केला, न भूतो न भविष्यते या उक्ती प्रमाणे अशी व्यक्ती या आधी कधी झाली नाही व या पुढेही कधी होणार नाही असे प्रतिपादन सौ गीता हिंगे यांनी आपल्या भाषणात केले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोहनभाऊ मोटघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश आत्राम यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने वर्षा शेडमाके,सीमा कन्नमवार,मारोतराव मेश्राम सुनिता आलेवार,प्रतिभा सोनवने,भूमी कोंडावार , छोटीताई मेश्राम , बनसोड , लोहकरे,गेडाम परिवार तसेच समस्त सर्वोदय वॉर्ड चे प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.