*_”माऊली विठ्ठलाच्या कृपेने अडपल्ली येथे भव्य भागवत सप्ताह संपन्न” या भागवत सप्ताहाला मा.खा.अशोकजी नेते यांच्यासह आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचीही उपस्थिती…._*
दिं. २९ नोव्हेंबर २०२४
मौजा- अडपल्ली (गोगांव), ता. जि. गडचिरोली येथे चैतन्य सत्संग सेवा मंडळाच्या वतीने भव्य भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात माऊली विठ्ठलाच्या कृपेने श्रावणदास महाराजांच्या मुखकमलातून एकनाथी भागवताचा ज्ञानयज्ञ संपन्न झाला.
या भागवत सप्ताह कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भागवत सप्ताह हा अध्यात्मिक जागृतीचे प्रेरणास्थान आहे. भागवतामध्ये हरिनाम हे जीवन सुधारण्याची आणि आनंद प्राप्त करण्याची प्रभावी साधना आहे. आजच्या काळात भागवत सप्ताहाच्या आयोजनाची गरज अधिक आहे, कारण यामुळे आचार-विचारांची देवाणघेवाण होऊन मन प्रसन्न व उत्साही राहते.”
याबरोबरच पुढे बोलताना म्हणाले नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. मिलिंदजी नरोटे यांना प्रंचड मताने निवडून आणण्यात आपल्या गावाचा सिंहाचा व मोलाचा वाटा आहे. निवडणूकिच्या विजयात या गावातील नागरिकांनी दिलेल आशीर्वादरुपी प्रेम व घवघवीत यशामुळे या निमित्ताने गावाचं मि आभार व धन्यवाद मानतो. यासोबतच लोकसभेमध्ये मि जरी हरलो असेल तरी सुद्धा गावचं या जिल्ह्याचं विकास करण्यास व जनतेच्या सेवेत मी सदैव तत्पर राहील.माझ्या विशेष प्रयत्नांमुळे गडचिरोलीत रेल्वेचे काम मार्गी लागले असुन हे काम सुद्धा आपल्या गावापर्यंत आले यांचा आनंद आहे.आपल्या गावातील नागरिक जनतेनी लोकसभेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल परत आभार व धन्यवाद !.देतोय
या भागवत सप्ताहामुळे आपण चांगले विचार घेऊन व या देशाचे चांगले नागरिक व्हा अशा शुभेच्छा देतो.असे प्रतिपादन माजी खासदार अशोकजी नेते यांनी यावेळी भागवत सप्ताह निमित्त व्यक्त केले.
*_या भागवत सप्ताह कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती_*
गडचिरोली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, प्रवचनकार ढोंगे गुरुजी, नरेश सालोटकर, उमाकांत चौधरी, प्रविण मस्के, योगाजी बोबाटे, रुपेश चौधरी, आकाश भोयर यांसह गावातील प्रतिष्ठीत ज्येष्ठ नागरिक आणि बंधू भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
*गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
गावातील भाविक भक्त, महिलावर्ग, युवक-युवती व बालगोपाल यांनी या भागवत सप्ताहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हरिनाम कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून अध्यात्मिक ऊर्जेने गावातील वातावरण भक्तिमय झाले. आयोजक मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.