*_”राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतील अमृतमय विचार घराघरात पोहोचवा” मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन.._*

31

*_”राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतील अमृतमय विचार घराघरात पोहोचवा” मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन.._*

 

*_गडचिरोलीतील गोकुळनगर शाखेत ५६ व्या पुण्यस्मुर्ती सप्ताह कार्यक्रम उत्साहात संपन्न.._*

 

दिं. २८ डिसेंबर २०२४

गडचिरोली:-: अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळ,शाखा- गोकुळनगर च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यस्मुर्ती सप्ताह तथा सर्वसंत स्मृती मानवता दिन दि.२२डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ पर्यंत गडचिरोली येथील गोकुळनगर शाखेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी

माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी

आपल्या प्रेरणादायी भाषणातून तुकडोजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व उलगडत म्हणाले,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतील अमृतमय विचार घराघरात पोहोचवत “आजच्या तरुण पिढीने तुकडोजी महाराजांच्या विचारांमधून जीवनाचा धडा घ्यावा. ग्रामगीतेतील विचार आणि आचार आत्मसात केल्यास खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होईल. आजच्या काळात समाजात धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे.”

 

कार्यक्रमाची सुरुवात मा.खा.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या विचारमंथनातून तुकडोजी महाराजांच्या शिकवणीचा वारसा कसा जपला जावा, यावर भर दिला. कार्यक्रमामध्ये ग्रामगीतेतील निवडक ओव्या सादर करत त्यांच्या अर्थाचे विश्लेषण करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,उपाध्यक्ष श्री. गु.से.मं.गड. अरविंद जी पा.वासेकर,सल्लागार सुरेशजी मांडवगडे, सचिव श्री.गु.से. मं.पंडित पुडके, शाखाप्रमुख अनिल धात्रक,दिलिप मेश्राम, कवडुजी येरमे,शाखेचे पदाधिकारी नागोराव उईके,मारोतराव उईके, पुरुषोत्तम कुळमेथे,माणिक गेडाम, आत्माराम आंबोरकर, सुखदेवजी वेठे, भास्कर नरुले,चंद्रभान जांभुळकर,किसन मडावी, नथ्थुजी चिमुरकर, दिलीप कांबळे,श्याम वाढई, यांच्यासह गोकुळ नगरातील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

याप्रसंगी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने शोक व्यक्त्त करत उपस्थितांनी मौन पाडून श्रद्धांजली वाहिली.

 

कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिक, युवक व महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. उपस्थितांनी या कार्यक्रमातून तुकडोजी महाराजांच्या शिकवणीची शिकवण मिळाली. त्यांच्या विचारांची पेरणी घराघरात व्हावी आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधता यावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन गोकुळनगर शाखेच्या वतीने यशस्वीपणे करण्यात आले.