*_कचारगड यात्रेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांचे आश्वासन_*

31

*_कचारगड यात्रेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांचे आश्वासन_*

 

*_कचारगड – केवळ धार्मिक स्थळ नव्हे, तर आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मा.खा.नेते_*

 

*जनजाती चेतना समितीच्या वतीने प्रबोधन मेळाव्याचे आयोजन*

 

धनेगाव, ता. सालेकसा, जि. गोंदिया | १२ फेब्रुवारी २०२५

 

माँ काली कंकाली कुपार लिंगो जनजाती चेतना समितीच्या वतीने आयोजित कचारगड यात्रा प्रबोधन मेळाव्यात आदिवासी समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी महाराष्ट्र सरकार संकल्पबद्ध असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांनी दिली. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी श्रद्धास्थानांच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मा. दुर्गादासजी उईके यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख उपस्थिती म्हणून SC/ST लोकसभा समिती अध्यक्ष मा. खा. फग्गनसिंहजी कुलस्ते, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. खा. अशोकजी नेते, आमदार डॉ. परीणयजी फुके, आमदार संजयजी पुराम, जनजाती चेतना परिषद प्रांत संयोजक प्रकाश गेडाम, समिती अध्यक्ष डॉ. नाजुकराव कुमरे,माजी जि.प. अध्यक्ष मा. विजयजी शिवणकर, माजी.आम. भैरसिंगजी नागपुरे, मा. नैतामजी, मा. श्यामजी धुर्वे, जि.प. व प.स. सभापती, मा. लोकनाथजी तितराम (समीती उपाध्यक्ष) आणि मा. संजयजी भावे (समिती सचिव )सविता ताई पुराम,सभापती चेतन वडगाये, मायाताई इरपाते,आदी मान्यवर उपस्थित होते.

 

*_कचारगड – केवळ धार्मिक स्थळ नव्हे, तर आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मा.खा.नेते_*

 

प्रबोधन मेळाव्यात मा. खा. अशोकजी नेते यांनी कचारगड यात्रेच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. पर्यटन, धार्मिक स्थळांचे जतन, मूलभूत सुविधा आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी सरकार ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

“कचारगड हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. त्यामुळे या यात्रेच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा, यात्रेसाठी आवश्यक व्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल. मी माझ्या स्थानिक विकास निधीतून संरक्षण भिंतीसाठी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत,” असे मा. खा. अशोकजी नेते यांनी जाहीर केले.

 

या मेळाव्यात आदिवासी समाजाच्या हक्क, विकास योजना आणि धार्मिक परंपरांसाठी आवश्यक सरकारी मदतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जनजाती चेतना समितीच्या वतीने समाजातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

 

कार्यक्रमात विविध प्रांतांतून आलेल्या कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवले. समितीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाला सशक्त बनवण्यासाठी चालवलेल्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

 

जनजाती चेतना समिती समाजाला एकत्र आणून प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करीत आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात जोडून त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, हा या चळवळीचा मुख्य हेतू असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले.