केंद्राने पत्रकार संरक्षण कायदा करून
तो देशभर लागू करावा :एस.एम.देशमुख
रायगड : देशातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा तयार करून तो देशभर लागू करावा अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली आहे.खासदार सुनील तटकरे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा अशीही देशमुख यांनी त्यांना विनंती केली आहे..
रायगड प्रेस क्लबचा 20 वा वर्धापनदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा आज खोपोली येथे साजरा करण्यात आला.. त्यावेळी एस.एम.देशमुख बोलत होते..
एस.एम. म्हणाले, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार सह देशाच्या विविध भागात पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत, पत्रकाराच्या हत्त्या होत आहेत..त्यांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही त्यामुळे केंद्रानेच हा कायदा करावा अशी मागणी एस.एम यांनी केली आहे..
महाराष्ट्रातही पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत कारण महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा तर केला मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही.. राज्यात लवकर पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही देशमुख यांनी केली..
यावेळी देशमुख यांनी रायगड प्रेस क्लबच्या कार्याचा गौरव केला..
खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात एस.एम.देशमुख यांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करून हा विषय आपण लोकसभेत उपस्थित करून पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू होईल यादृष्टीने नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले .. रायगड प्रेस क्लब करीत असलेल्या कार्याचा सुनील तटकरे यांनी गौरव केला..
प्रारंभी सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.. दैनिक सागरच्या संपादिका शुभदा तथा नानी जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्वाती घोसाळकर यांनी सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अन्य पत्रकारांचाही.यावेळी सन्मान करण्यात आला..
रायगड प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष मनोज खांबे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्याकडे सुपूर्द केली..
आजच्या कार्यक्रमास परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे,विशाल परदेशी मनोज खांबे, राजू जोशी आदिंची भाषणे झाली.