हरवलेले व चोरीला गेलेले 72 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
. सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडून शोध घेतलेले एकूण 11,11,600/- रुपये किंमतीचे मोबाईल पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे हस्ते तक्रारदारांना सुपूर्द
आजकाल तरुणपिढी मोठ¬ा प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदविली जाते. याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचेकडून सायबर अपराध व मोबाईल चोरीच्या गुन्ह्रांबाबत सतर्क राहून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोली यांचे मार्फत तांत्रिक कौशल्याच्या आधारे सदर चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात असतो.
मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रीक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येत असतो. सायबर पोलीस ठाणे, गडचिरोली यांचेकडून मागील वर्षी सन 2024 मध्ये एकुण 119 मोबाईलचा शोध घेण्यात आला असून त्यांची अंदाजे किंमत एकुण 19,31,912/- रुपये एवढी होती. तसेच तसेच माहे सप्टेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या चार महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या 53 मोबाईलचा शोध घेवुन दिनांक 07/01/2025 रोजी सदर शोध घेण्यात आलेल्या मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले होते.
यासोबतच माहे जानेवारी 2025 ते जून 2025 या सहा महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या एकुण 11,11,600/- रुपये किंमतीच्या 72 मोबाईलचा गडचिरोली पोलीस दलामार्फत शोध घेण्यात आलेला असून, आज दि. 04/07/2025 रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मिटींग हॉल येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे. सन 2025 या वर्षात आतापर्यंत सायबर पोलीस ठाणे, गडचिरोली यांचेकडून अंदाजे 19,67,161/- रुपये किंमतीच्या एकूण 125 मोबाईल फोनचा शोध घेण्यात आलेला असून ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत.
कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी जनतेला आवाहन केले की, “सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारंामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलीसांवर विश्वास ठेऊन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा. जेणेकरुन आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल आपल्याला परत मिळू शकतो तसेच अज्ञातांकडून आपल्या मोबाईलचा गैरवापर केला गेल्यास आपण सुरक्षित राहतो.”
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक व अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. गोकुळ राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि. नेहा हांडे, मपोहवा/638 वर्षा बहिरवार, पोअं/संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर यांनी पार पाडली.