राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग जानेवारी पासून सुरू होणार
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई: राज्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
लाकडाऊनच्या नियमामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. या आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.