मागील 1 वर्षा पासून सुरु असलेल्या अहेरी खमनचेरू चालू असलेल्या रोड चे काम फारेस्ट विभागाने अडवीले..माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची आलापल्ली चे (DFO) टोलीया साहेब यांच्याशी चर्चा

89

मागील 1 वर्षा पासून सुरु असलेल्या अहेरी खमनचेरू चालू असलेल्या रोड चे काम फारेस्ट विभागाने अडवीले..माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची आलापल्ली चे (DFO) टोलीया साहेब यांच्याशी चर्चा*

 

📝अहेरी:- तालुक्यातील ग्रा.प.खमनचेरु टू अहेरी हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात विकास कधी होणार तरी अहेरी खमनचेरू हे तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे.Cmgsy च्या अधिकाऱ्यांनी या रोड चे काम सुरु करून जनेची मागणी पूर्ण करायला तयार असतांना वनवीभागाचे काही कर्मचारीयांनी या कामात आडकाटी टाकून रोकून धरले असून अहेरी येथील माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यानी वन अधिकारी DFO साहेबाना यांना या बाबद विचारणा केली असता अहेरी खमनचेरू रोड चे काही भाग वनविभागाच्या अख्त्यांरीत येत असल्याने वन विभागाने काम रोखले अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु आहे.जे रोड मागील पन्नास वर्षांपासून असून अचानक पणे वन विभाच्या अख्त्यांरीत कसे काय? आले असा प्रश्न जनता करीत आहे.जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वनविभाग विकास रोकून धरतात हे मात्र समजण्या पलीकडचे आहे. जनता हि वेळो वेळी वन विभाला मदत करत असते मात्र वन विभाग मात्र जनेचे काम होऊ देत नाही हि मात्र चिंतेची बाबा आहे.लवकरच अहेरी खमनचेरू चे काम होणार सुरु. माजी जी. प. अध्यक्ष अजय ककडालवार याच्या प्रयत्नाना यश..!!

 

यावेळी उपस्थित ,सुनीता कुसनाके माजी जि. प.सदस्य, अहेरी नगर पंचायत चे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,विलास सिडाम नगरपंचायत सदस्य,विलास गलबले नगरपंचायत सदस्य,शायलू मडावी सरपंच खमनचेरु,वंदना दुर्गे सदस्य महागाव व इतर कार्यकर्ते आलापल्ली वनविभागाच्या कार्यलयात जाऊन DFO टोलिया यांच्या सोबत चर्चा करून अहेरी खमनचेरू रोड चे काम बंदअसल्याबाबद चर्चा करून रोडचे काम तात्काळ काम सुरु करण्या करीता बोलनी केले. त्यावेळी dfo टोलिया यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना केली व कोणत्याही प्रकारचे काम बंद पाडू नये अशी सूचना करून रोड चे काम सुरु करण्याचे तोंडी आदेश rfo ना दिले..!!