पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली युवकाची हत्या
गडचिरोली
भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावात पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी 26 वर्षीय युवकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना दिनांक 9 मार्च गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
. साईनाथ नरोटे वय 26 वर्ष असे नक्षल्यांनी हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. साईनाथ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता तो होळीनिमीत्त मर्दहुरला आपल्या स्वगावी आला होता. साईनाथ च्या हत्येने भामरागड परीसरात दहशतीचे वातावण पसरले आहे.







