*ओमराजेंच्या विक्रमी विजयाचा गडचिरोलीतील शिवसैनिकांनी केला जल्लोष !*

71

*ओमराजेंच्या विक्रमी विजयाचा गडचिरोलीतील शिवसैनिकांनी केला जल्लोष !*

*अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती…*

 

महाराष्ट्रातील महत्वपुर्ण लढतीपैकी एक लढत असलेल्या धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खा. ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा तब्बल 3 लाख 29 हजार 846 अशा विक्रमी मतांनी पराभव करीत सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला. त्यांच्या विजयाचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेृत्वात गडचिरोली शहरात गुलालाची उधळण; फटाक्याची आतिषबाजी आणि भगव्या पताका उंचावून गगनभेदी नारे देत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा वेळोवेळी पहावयास मिळाला, ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मा. उध्दव साहेब ठाकरे यांनी मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. कागदावर बलाढ्य असलेल्या महायुतीचा विजय सहज होईल असे आडाखे अनेकांकडून बांधले जात होते. त्या सर्व आडाख्यांना बाजूला सारत ओमराजे निंबाळकर यांनी माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा तब्बल 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभव केला आहे. ओमराजे निंबाळकर यांना 7 लाख 48 हजार 752 तर अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 इतकी मते मिळाली आहेत.

विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रा. तानाजी सावंत यांच्या भूम. परंडा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. या ऐतिहासिक विजयाचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. सर्वप्रथम अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयापासून इंदिरा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली इंदिरा गांधी चौकात पोहचल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिंदाबाद, हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, मा. उध्दवसाहेब ठाकरे यांचा विजय असो, मा. आदित्यसाहेब ठाकरे यांचा विजय असो, ‘गरीबो का नेता कैसा हो.. ओमराजे निंबाळकर जैसा हो’, ओमदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एकच वादा, ओम दादा, अशा गगनभेदी घोषणा देऊन शेकडो शिवसैनिकांनी गडचिरोली शहर दणाणून सोडला.

 

*लढवय्या आणि जनसेवेला वाहून घेणाऱ्या शिवसैनिकाला कुणीच पराजीत करू शकत नाही. ➖ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार*

*खासदार ओमराजे हे लढवये शिवसैनिक असून जनतेचे खरे राजे आहेत. त्यांनी स्वतला जनसेवेसाठी वाहून घेतले आहे. त्यांनी सत्य व न्यायासाठी लढा दिला. ते गोरगरीबांचे कैवारी आहेत. ओमराजेंनी विक्रमी मतांनी प्राप्त केलेला विजय हा जनतेच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेले आदराचे स्थान आहे हे अधोरेखीत होते. कितीही संकटे आली तरी विकासाचे ध्येय उराशी बाळगून जनतेचा सेवक म्हणून जनकल्याणासाठी लढणाऱ्या मा. बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना कुणीच पराभूत करू शकत नाही, हे ओमराजेंनी दाखवून दिले आहे अशी भावना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गडचिरोली उप तालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, संदिप भुरसे, अमित बानबले, दिलीप चनेकार, चुडाराम मुनघाटे, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वेलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कांबडी, सुधाकर सावसागडे, राजु जवादे, अरुण बारापात्रे, संजय मेश्राम, दशरथ चापडे, रत्नाकर रंधये, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, अमर निंबोड, अनंत हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवळूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.