*वांगेपल्ली पोचमार्गाचे भूमिपूजन*
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते
*रस्ता सुलभ होणार!*
*अहेरी*:- लगतच्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली पुलीया कडे जाणाऱ्या पोचमार्गाचे भूमिपूजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतेच केले असून त्यामुळे आता रस्ता सुलभ होणार असून कायमचे रस्त्याची समस्या सुटणार आहे.
वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीवरील पुलीया मुळे रोज महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील नागरिकांचे अवागमन सुरू असते. याच मार्गावरून नेहमी बसेस व खाजगी वाहने चालतात. परंतु रस्ता व्यवस्थित नसल्याने वाहतुकीची व प्रवाशांची आणि दुचाकीने ये -जा करणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण व ससेहोलपट व्हायची. परंतु आता जिल्हा वार्षिक आदिवासी उपायोजना किमान गरजा कार्यक्रमा अंतर्गत रस्ता बनणार असल्याने व मंत्री यांनी नुकतेच भूमिपूजन केल्याने वांगेपल्ली पोचमार्गाचे कायमस्वरूपी समस्या सुटणार आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, साई बोम्मावार, अरुण मुक्कावार, सुरेंद्र अलोणे, मांतया आत्राम, बाबुराव तोरेम, आदित्य जक्कोजवार, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, अहेरी व वांगेपल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.